ट्रॅफिकिंगशी लढणे म्हणजे केवळ वरवरचा विचार करणे नव्हे, तर पैशांच्या प्रवाहाचा मागोवा घेणे. बालमजुरी ही केवळ गरिबीमुळे होत नाही तर ते एक प्रकारचे शोषण असल्याचं बाल हक्क कार्यकर्ते आणि 'जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन'चे संस्थापक भुवन रिभु सांगतात. संरक्षणासाठी कुणीही नसल्यामुळे मुलांना कशाप्रकारे वापरले जाते, याबद्दल भुवन रिभू यांनी सविस्तर सांगितलं आहे. आणि ही समस्या मुळापासून संपवण्यासाठी स्त्रोतापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कायद्याचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केलं आहे.